Crime
उल्हासनगरमध्ये हुंड्याच्या छळाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या
Watch on:
▶️ YouTube
उल्हासनगर येथील २८ वर्षीय नित्या राय यांनी हुंड्यासाठी होणाऱ्या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून गळफास घेत जीवन संपवले आहे. या प्रकरणी पती गौरव राय, सासू आणि आजी यांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा आणि छळ होत असल्याचा आरोप आहे. या जाचाला कंटाळून २८ वर्षीय नित्या राय यांनी गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर आईचे छत्र हरपले आहे.
नित्या राय यांचा सुमारे पाच वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या गौरव राय यांच्याशी विवाह झाला होता. नित्या यादेखील उच्चशिक्षित होत्या. लग्नाच्या वेळी त्यांच्या वडिलांनी रोख स्वरूपात हुंडा दिल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सुरुवातीची काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अलीकडच्या काळात पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले.
माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी सासरच्या मंडळींकडून नित्याचा सातत्याने छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून नित्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती गौरव राय, सासू आणि आजी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. उच्चशिक्षित विवाहितेच्या मृत्यूच्या या घटनेने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
नित्या राय यांचा सुमारे पाच वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या गौरव राय यांच्याशी विवाह झाला होता. नित्या यादेखील उच्चशिक्षित होत्या. लग्नाच्या वेळी त्यांच्या वडिलांनी रोख स्वरूपात हुंडा दिल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सुरुवातीची काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अलीकडच्या काळात पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले.
माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी सासरच्या मंडळींकडून नित्याचा सातत्याने छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून नित्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती गौरव राय, सासू आणि आजी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. उच्चशिक्षित विवाहितेच्या मृत्यूच्या या घटनेने उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.